Saturday, May 10, 2008
Tuesday, May 6, 2008
राजवरील कारवाईवरून मंत्रिमंडळात खडाजंगी
Please Give Your Suggestion's In The Box Provided On Website To Improve Us.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गेल्या शनिवारी शिवाजी पार्कवर झालेल्या भाषणाचे तीव्र पडसाद आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत उमटले. राज यांना सुरक्षा व्यवस्था पुरवून विनाकारण त्यांचे महत्त्व वाढवले जात असल्याची टीका करत काही मंत्र्यांनी अप्रत्यक्षरीत्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनाच टार्गेट केले. ....
त्यामुळे वैतागलेल्या आबांनी, "राज यांच्यावर कारवाई केली तरी चूक ठरवले जाते; नाही केली तरी चूक ठरवले जाते,' अशी उद्विग्नता व्यक्त करत थेट राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. अखेर मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी हस्तक्षेप करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.
आज मंत्रिमंडळाचे कामकाज आटोपल्यावर मुख्य सचिव व अन्य सचिवांना बाहेर जाण्यास सांगण्यात आले. यानंतर इतर राजकीय विषयांवर चर्चा सुरू झाली तेव्हा कॉंग्रेसबरोबरच राष्ट्रवादीच्या काही मंत्र्यांनीही "राज ठाकरे यांना महत्त्व का दिले जात आहे? त्यांच्या मागे-पुढे पोलिसांच्या गाड्या धावत असतात. त्यांना संरक्षण देण्याची काय गरज आहे,' असा सवाल उपस्थित केला; तर "राज ठाकरे, अबू आझमी वाट्टेल ते बोलत असतात. राज्यात कायदा व सुव्यवस्था आहे की नाही,' असे टीकास्त्र गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यावर मंत्र्यांनी सोडले.
कॉंग्रेसबरोबरच स्वपक्षीय मंत्र्यांकडून घरचा आहेर मिळाल्याने आबा प्रचंड वैतागले. "राज यांच्यावर कारवाई करावी, तर कारवाई करून विनाकारण मोठे कशाला करता, असे बोलले जाते आणि कारवाई केली नाही, तरी चुकीचे ठरवले जाते. राज्यात कायदा व सुव्यवस्था नसेल तर मी राजीनामा देतो,' असे उद्विग्न उद्गार आबांनी काढले. वाद इतका टोकाला गेलेला पाहून मुख्यमंत्री देशमुख यांनी हस्तक्षेप केला. सध्या राज यांचा विषय सर्वत्र सुरू असल्याने मंत्री बोलत आहेत, तुम्ही वैयक्तिक घेऊ नका, असा दिलासा आबांना देत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. अखेर राज यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा फेरविचार करण्यात येईल, असे आबांनी सांगितले. राज व अबू आझमी यांच्या भाषणांच्या, विधानांच्या बाबतीत कायदेशीर बाजू तपासण्यात येत आहे, असेही आबांनी सांगितले.
राज ठाकरे यांनी ३ मे रोजी जाहीर सभेत केलेले भाषण पूर्ण तयारीचे होते. मुंबईत कोणीही येऊन राहू शकते, हा प्रत्येक नागरिकाचा घटनादत्त अधिकार आहे, असा युक्तिवाद करणाऱ्यांना घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीच लिहिलेल्या "भाषावार प्रांतरचना' या पुस्तकातील उताऱ्यांचा हवाला देऊन त्यांनी मुंबईवर अधिकार मराठी माणसाचाच, या आपल्या भूमिकेचे जोरदार समर्थन केले. आता "हे मी म्हणत नाही, बाबासाहेब म्हणतात,' असे सांगणाऱ्या राजवर कशी कारवाई करणार, असा सवाल एका ज्येष्ठ मंत्र्याने केला.
------------------------------------------------------------
आबांचा इन्कार
मंत्रिमंडळातील खडाजंगीबाबत उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, असा कुठलाही प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. राज यांच्यावरील कारवाईवरून मंत्र्यांमध्ये वादविवाद झाला नसल्याचेही ते म्हणाले. आपण राजीनाम्याची धमकी दिल्याच्या वृत्ताचाही त्यांनी इन्कार केला.
------------------------------------------------------------
Saturday, May 3, 2008
राज ठाकरे पुन्हा कडाडले!
Saturday, April 12, 2008
Friday, March 28, 2008
Thursday, March 27, 2008
"मनसे'ने व्यंगचित्रातून उडविली अमिताभची खिल्ली
Thursday, March 20, 2008
Tuesday, March 18, 2008
ये भैया
ये भैया
ये भैया........साल्या ज़रा कमी काम कर
आमच्या मराठी माणसाला काम दान कर
हात हलवत साल्या मुंबईत आलास
मराठी माणसाला वाटतय.....महाराष्ट्रापासून पोरका केलास..!!
दिवस भर काम करून उशिरा झोपतोस
थंडी असून सुद्धा रात्री ३ ला उठतोस.....
मराठी माणसाला नाही रे जमत
पण तू ४ ला वाशी मार्केट कसं काय गाठतोस
काय रे बाबा कुठल्या हाडामासाचा बनलास
अति श्रम करून पण न कधी दमलास
लोक म्हणतात तुला आत्ता माज चढलाय
पण मला वाटतय तुझ्यातच मेहनती माणूस दडलाय
मराठी माणसाची आधीच बोंब
कोणीतरी पेटवतो मग आगेचा डोंब
गाढवा सारखा मग वागू लागतो
उद्याच्या महाराष्ट्राची स्वप्ने बघू लागतो
विरारला रहायच, १० ला चर्चगेट गाठायचं
५.३० ला सुटलो की प्रेयसिला भेटायचं
मराठी माणसाने शोधलेला वडापाव
शेजवान जम्बो किंग च्या नावाने रेटायचं
माझ्या मराठी माणसाची नाही रे लांब उडी
नाकी नऊ येतात बसवताना संसाराची घडी
किती कधी कसे मिळतील.....पैसे याचाच विचार करतो
१५ हजरात मिळणा-या अनंदासाठी मर मर मरतो
का नाही करत तो तुझ्या सारखी मेहनत
आणू शकतो रे तो ही......इंद्राचा ऐरावत
समजू नको त्याला तू असा आळशी
गावभर हिंडतोय रे तो असून काखेत कळशी
Saturday, March 8, 2008
"मनसे'च्या वर्धापनदिनाला कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या दुसरा वर्धापनदिन आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घातलेल्या बंदीमुळे जाहीर सभा होणार नसली तरी त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना "कृष्णकुंज' या निवासस्थानी बोलावले आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने उद्या शक्तिप्रदर्शन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ....
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे होणाऱ्या जाहीर कार्यक्रमास महानगरपालिकेने परवानगी नाकारल्यामुळे पक्षाला कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. सार्वजनिक हित व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेता पोलिसांनी परवानगी न दिल्याने शिवाजी पार्कवर साजरा होणाऱ्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही, असे पत्र महापालिकेच्या जी - उत्तर कार्यालयाकडून देण्यात आले आहे. याचा "मनसे'च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
"मनसे'ने उत्तर भारतीयांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषण, रॅली आणि पत्रकार परिषदांवर पोलिसांनी बंदी घातली होती. ही बंदी वाढविण्यात आल्यावर त्याची मुदत संपताच राज ठाकरे यांच्यावर "कारणे दाखवा' नोटीस बजाविण्यात आली. पक्षातर्फे या नोटिशीला उत्तर देण्यात आले असले तरी पोलिसांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने उद्या ९ मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी सहमती दिली नाही. त्यामुळे महानगरपालिकेनेही शिवाजी पार्क मैदानावर मागितलेल्या परवानगीला नकार कळविला आहे.
महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या हितासाठी बोलणे हा या मराठी राज्यात गुन्हा ठरू लागला आहे. भाषण बंदी घालून समाधान न झाल्यामुळे आता "मनसे'चा वर्धापनदिन साजरा होऊ नये यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न चालविले आहेत, त्याबद्दल पक्षातर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.
दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविलेल्या नोटिशीला आलेले उत्तर असमाधानकारक आणि अस्पष्ट असल्याने त्यांना सोमवारपर्यंत आणखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरील बंदीबाबतचा निर्णय सोमवारी होईल, असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.
Friday, March 7, 2008
राज ठाकरे इशारा देताना!!!
Dont use Internet explorer, best viewed in Opera.(If you cant view video use Opera etc.)
Thursday, March 6, 2008
Marathi Tutari
मराठी भाषा व संस्कृतीबाबत तडजोड नाही, अशी भूमिका मांडताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांनी महाराष्ट्रात शिस्तीत राहावे, असा दम आज भरला. मनसेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी आपण कल्याणमध्ये घेतलेल्या भूमिकेबाबत आजही ठाम असल्याचे सांगितले. ......
महाराष्ट्रात बिहाऱ्यांनी आईवरून शिवी दिली किंवा तसा प्रयत्नही झाला तर रोज कानफाटात मारेन, असा इशारा त्यांनी दिला. मराठी माणसाने दुसऱ्याला दूषणे देण्यापेक्षा स्वत:च्या उत्कर्षासाठी स्वत:च झटले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.
"मनसे'च्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी अशोक हांडे निर्मित "मराठी बाणा' हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. कार्यक्रमाच्या मध्यांतराच्या वेळी राज ठाकरे यांचे आगमन झाले व थोड्याच वेळाने सत्कारांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचे भाषण सुरू झाले. आजच्या दिवशी "मराठी बाणा' हाच कार्यक्रम हवा होता, असे सांगताना फक्त त्यासाठीच हा वर्धापनदिन सायंकाळऐवजी सकाळी घेतल्याचे त्यांनी सांगितले. हांडेंचे कार्यक्रम राज्यात खूप ठिकाणी लावणार आहे. मराठी भाषा व संस्कृतीसाठी ही धडपड आहे. कला व साहित्य कसे जगेल हे पाहा, असा सल्ला देताना ते टिकविण्यासाठी पक्षाकडून पावले उचलली जातील, हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. नगरसेवकापासून ते खासदारापर्यंत सर्वच मराठी; पण बकालपणासाठी मराठी भाषकांना कारणीभूत ठरवताना रेशनकार्डापासून ते लायसन्स परप्रांतीयांना कशी सहज उपलब्ध होतात, याबाबत त्यांनी भाषणात खंत व्यक्त केली.
""मला महाराष्ट्राला जो नवा चेहरा द्यायचा आहे, तो या नव्या चेहऱ्यांतूनच, असे राज यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या विषयाला त्यांनी आपल्या भाषणात हात घातला. १२२ वर्षे असलेल्या कॉंग्रेसला १० लाख ३१ हजार मते, ४१ वर्षे जुन्या शिवसेनेला ८ लाख ७७ हजार मते व १० महिन्यांपूर्वीच्या मनसेला ४ लाख ५१ हजार मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर चौथ्या क्रमांकावर गेली,'' असे सांगत ""माझ्या वाटचालीबाबत ज्यांना चिंता वाटते त्यांनी हे आकडे पाहावेत,'' असा सल्ला त्यांनी दिला.
ते पुढे म्हणाले, ""जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्त हरसूल या गावात गेलो होतो. अगदी गुजरातच्या सीमेला लागून हे गाव आहे. तेथपर्यंत मनसेचा झेंडा, नाव पोचले आहे. मनसेला स्थानिक उमेदवार मिळाले; पण कॉंग्रेसला ते बाहेरून आणावे लागले. वर्षभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेला मनसे हा पहिला पक्ष असून, शिवसेना तरी वर्षभरात इतकी पोचली होती का,'' असा प्रश्न त्यांनी केला. पुण्यात पहिल्या वर्षी नंदू घाटे हे एकमेव नगरसेवक, नंतर पुढच्या वेळी काका वडके, त्यानंतर शशिकांत सुतार. मात्र पुण्यात मनसेचे पहिल्याच निवडणुकीत ८ नगरसेवक निवडून आले. नाशिकमध्ये १२ व २४ ठिकाणी मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत, असे सांगून, पुण्यात मनसेचा झालेला शिरकाव महत्त्वाचा असल्याचे राज म्हणाले.
आता निवडणुकाही झाल्या आहेत व मनसेची बांधणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढच्या काळात कार्यकर्त्यांसाठी ठोस कार्यक्रम, आराखडा असेल. भविष्यात रिझल्ट दिसतील व तुमच्याच रूपाने ते दिसतील, असे राज यांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाडात प्रतिसाद दिला.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिंकणाऱ्या नेत्यांची मोट बांधून पक्ष काढला. पण मला सामान्य कार्यर्कत्यांंना मोठे करायचे आहे. असेही त्यांनी सांगितले. मनसेच्या वाटचालीबद्दल मनोहर जोशी यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. सरांनी मागे वळून स्वत:चा राजकीय प्रवास बघावा. त्यांनी पक्षासाठी केव्हा स्वत:च्या खिशात हात घातला आहे का ? असा सवाल राजनी केला.
बाबा मला तो...
उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता ते माझ्यावर दुसऱ्यांना टीका करायला लावतात. माझ्यावर थेट टीका करायची हिंमत ते करत नाहीत. स्वत: नामनिराळे रहातात. पण मी जरा फटकारले तर बाबा मला तो... अशी नक्कल त्यांनी केली.