Friday, March 28, 2008

Raj has the right to say whatever he wants: Big B


New Delhi: The war of words between MNS chief Raj Thackeray and superstar Amitabh Bachchan seems to be intensifying with each passing day.


In the latest face-off, a day after MNS workers displayed posters of the superstar targeting him for taking back his land "donation" to farmer in Pune, Bachchan broke his silence on Friday.


He said India is a democracy and everyone is free to speak. “One should abide by the Constitution and the law of the land. This is a democracy. Every person has the right to express themselves. This matter (the land issue) is sub-judice. I cannot comment on it,” he said.

On Thursday, a banner mocking filmstar Bachchan's land donation controversy in Pune was put up, allegedly by MNS activists, at the Dadar junction in central Mumbai.

The political banner was seen is the MNS party's commentary on Bachchan's U-turn on the land donation in Pune's Maval area and his farmer status.

On March 23, Bachchan spoke for the first time on Thackeray's charge that he has done precious little for Mumbai, dismissing the allegations.

Referring to MNS chief’s charges, Bachchan said, "Random charges are random. They do not deserve the kind of attention you wish me to give them. This is a free country and every individual enjoys the liberty of free speech."

Thursday, March 27, 2008

"मनसे'ने व्यंगचित्रातून उडविली अमिताभची खिल्ली


महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा "छोरा गंगा किनारेवाला' अभिनेता अमिताभ बच्चन याच्याविरुद्ध आवाज उठविला आहे. यावेळी पक्षाने व्यंगचित्राच्या माध्यमातून सुपरस्टार अभिनेत्याची खिल्ली उडविली आहे. श्री. बच्चन यांनी नुकतीच मावळ तालुक्‍यातील पाले येथील २० एकर जमिनीचे दानपत्र मागे घेतले आणि ही जमीन दान करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले. यासाठी आपण शेतकरी असल्याचा पुरावाही श्री. बच्चन यांनी सादर केला. या पार्श्‍वभूमीवर, "मनसे'तर्फे बुधवारी रात्री दादर परिसरात या निर्णयाची खिल्ली उडविणारे फलक लावण्यात आले. त्यामध्ये श्री. बच्चन यांचे नाव न देता एक माणूस "माझे दान परत करा' अस म्हणत असल्याचे रेखाटण्यात आले आहे. फलकाच्या खाली "सुपरस्टार शेतकरी' हे दोन शब्द आहेत. गुरुवारी सकाळी हे फलक काढून टाकण्यात आले. फलक कोणी काढले, हे अजून स्पष्ट झाले नाही. "मनसे'च्या मते पोलिसांनीच हे फलक काढून टाकले. "एक सुपरस्टार अभिनेता जर शेतकरी होणार असेल, तर देशातील शेतकऱ्यांना सुगीचे दिवसच आलेत हेच यातून दिसते.', हे लोकांपर्यंत पोचविण्यासाठीच आम्ही हे फलक लावल्याचे पक्षाच्या प्रवक्‍त्याने सांगितले. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्याही कमी होतील, असे मत या प्रवक्‍त्याने व्यक्त केले.

Thursday, March 20, 2008

Jabardast Tola

Tuesday, March 18, 2008

ये भैया



ये भैया

ये भैया........साल्या ज़रा कमी काम कर
आमच्या मराठी माणसाला काम दान कर
हात हलवत साल्या मुंबईत आलास
मराठी माणसाला वाटतय.....महाराष्ट्रापासून पोरका केलास..!!

दिवस भर काम करून उशिरा झोपतोस
थंडी असून सुद्धा रात्री ३ ला उठतोस.....
मराठी माणसाला नाही रे जमत
पण तू ४ ला वाशी मार्केट कसं काय गाठतोस

काय रे बाबा कुठल्या हाडामासाचा बनलास
अति श्रम करून पण न कधी दमलास
लोक म्हणतात तुला आत्ता माज चढलाय
पण मला वाटतय तुझ्यातच मेहनती माणूस दडलाय

मराठी माणसाची आधीच बोंब
कोणीतरी पेटवतो मग आगेचा डोंब
गाढवा सारखा मग वागू लागतो
उद्याच्या महाराष्ट्राची स्वप्ने बघू लागतो

विरारला रहायच, १० ला चर्चगेट गाठायचं
५.३० ला सुटलो की प्रेयसिला भेटायचं
मराठी माणसाने शोधलेला वडापाव
शेजवान जम्बो किंग च्या नावाने रेटायचं

माझ्या मराठी माणसाची नाही रे लांब उडी
नाकी नऊ येतात बसवताना संसाराची घडी
किती कधी कसे मिळतील.....पैसे याचाच विचार करतो
१५ हजरात मिळणा-या अनंदासाठी मर मर मरतो

का नाही करत तो तुझ्या सारखी मेहनत
आणू शकतो रे तो ही......इंद्राचा ऐरावत
समजू नको त्याला तू असा आळशी
गावभर हिंडतोय रे तो असून काखेत कळशी

Saturday, March 8, 2008

"मनसे'च्या वर्धापनदिनाला कार्यकर्त्यांचे शक्तिप्रदर्शन

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा उद्या दुसरा वर्धापनदिन आहे. पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर घातलेल्या बंदीमुळे जाहीर सभा होणार नसली तरी त्यांनी पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांना "कृष्णकुंज' या निवासस्थानी बोलावले आहे. त्यामुळे पक्षाच्या वतीने उद्या शक्तिप्रदर्शन होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत आहे. ....
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवाजी पार्क येथे होणाऱ्या जाहीर कार्यक्रमास महानगरपालिकेने परवानगी नाकारल्यामुळे पक्षाला कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. सार्वजनिक हित व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्‍न लक्षात घेता पोलिसांनी परवानगी न दिल्याने शिवाजी पार्कवर साजरा होणाऱ्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला परवानगी देता येणार नाही, असे पत्र महापालिकेच्या जी - उत्तर कार्यालयाकडून देण्यात आले आहे. याचा "मनसे'च्या वतीने तीव्र निषेध व्यक्त करण्यात आला आहे.

"मनसे'ने उत्तर भारतीयांविरोधात पुकारलेल्या आंदोलनाचे हिंसक पडसाद उमटल्यामुळे पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भाषण, रॅली आणि पत्रकार परिषदांवर पोलिसांनी बंदी घातली होती. ही बंदी वाढविण्यात आल्यावर त्याची मुदत संपताच राज ठाकरे यांच्यावर "कारणे दाखवा' नोटीस बजाविण्यात आली. पक्षातर्फे या नोटिशीला उत्तर देण्यात आले असले तरी पोलिसांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतला नसल्याने उद्या ९ मार्च रोजी होणाऱ्या पक्षाच्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमाला पोलिसांनी सहमती दिली नाही. त्यामुळे महानगरपालिकेनेही शिवाजी पार्क मैदानावर मागितलेल्या परवानगीला नकार कळविला आहे.

महाराष्ट्राच्या व मराठी माणसाच्या हितासाठी बोलणे हा या मराठी राज्यात गुन्हा ठरू लागला आहे. भाषण बंदी घालून समाधान न झाल्यामुळे आता "मनसे'चा वर्धापनदिन साजरा होऊ नये यासाठी राज्यकर्त्यांनी प्रयत्न चालविले आहेत, त्याबद्दल पक्षातर्फे तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना पाठविलेल्या नोटिशीला आलेले उत्तर असमाधानकारक आणि अस्पष्ट असल्याने त्यांना सोमवारपर्यंत आणखी स्पष्टीकरण देण्यास सांगितले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावरील बंदीबाबतचा निर्णय सोमवारी होईल, असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी सांगितले.

Friday, March 7, 2008

राज ठाकरे इशारा देताना!!!

Dont use Internet explorer, best viewed in Opera.(If you cant view video use Opera etc.)

Thursday, March 6, 2008

Marathi Tutari



मराठी भाषा व संस्कृतीबाबत तडजोड नाही, अशी भूमिका मांडताना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी परप्रांतीयांनी महाराष्ट्रात शिस्तीत राहावे, असा दम आज भरला. मनसेच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात बोलताना ठाकरे यांनी आपण कल्याणमध्ये घेतलेल्या भूमिकेबाबत आजही ठाम असल्याचे सांगितले. ......
महाराष्ट्रात बिहाऱ्यांनी आईवरून शिवी दिली किंवा तसा प्रयत्नही झाला तर रोज कानफाटात मारेन, असा इशारा त्यांनी दिला. मराठी माणसाने दुसऱ्याला दूषणे देण्यापेक्षा स्वत:च्या उत्कर्षासाठी स्वत:च झटले पाहिजे, अशी भूमिकाही त्यांनी या वेळी मांडली.

"मनसे'च्या वर्धापनदिनानिमित्त षण्मुखानंद सभागृहात कार्यकर्त्यांच्या मनोरंजनासाठी अशोक हांडे निर्मित "मराठी बाणा' हा कार्यक्रम आयोजिण्यात आला होता. कार्यक्रमाच्या मध्यांतराच्या वेळी राज ठाकरे यांचे आगमन झाले व थोड्‌याच वेळाने सत्कारांचा कार्यक्रम आटोपल्यानंतर त्यांचे भाषण सुरू झाले. आजच्या दिवशी "मराठी बाणा' हाच कार्यक्रम हवा होता, असे सांगताना फक्‍त त्यासाठीच हा वर्धापनदिन सायंकाळऐवजी सकाळी घेतल्याचे त्यांनी सांगितले. हांडेंचे कार्यक्रम राज्यात खूप ठिकाणी लावणार आहे. मराठी भाषा व संस्कृतीसाठी ही धडपड आहे. कला व साहित्य कसे जगेल हे पाहा, असा सल्ला देताना ते टिकविण्यासाठी पक्षाकडून पावले उचलली जातील, हे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. नगरसेवकापासून ते खासदारापर्यंत सर्वच मराठी; पण बकालपणासाठी मराठी भाषकांना कारणीभूत ठरवताना रेशनकार्डापासून ते लायसन्स परप्रांतीयांना कशी सहज उपलब्ध होतात, याबाबत त्यांनी भाषणात खंत व्यक्‍त केली.

""मला महाराष्ट्राला जो नवा चेहरा द्यायचा आहे, तो या नव्या चेहऱ्यांतूनच, असे राज यांनी म्हणताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. मुंबई महापालिका निवडणुकीच्या विषयाला त्यांनी आपल्या भाषणात हात घातला. १२२ वर्षे असलेल्या कॉंग्रेसला १० लाख ३१ हजार मते, ४१ वर्षे जुन्या शिवसेनेला ८ लाख ७७ हजार मते व १० महिन्यांपूर्वीच्या मनसेला ४ लाख ५१ हजार मते मिळाली. राष्ट्रवादी कॉंग्रेस तर चौथ्या क्रमांकावर गेली,'' असे सांगत ""माझ्या वाटचालीबाबत ज्यांना चिंता वाटते त्यांनी हे आकडे पाहावेत,'' असा सल्ला त्यांनी दिला.

ते पुढे म्हणाले, ""जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारानिमित्त हरसूल या गावात गेलो होतो. अगदी गुजरातच्या सीमेला लागून हे गाव आहे. तेथपर्यंत मनसेचा झेंडा, नाव पोचले आहे. मनसेला स्थानिक उमेदवार मिळाले; पण कॉंग्रेसला ते बाहेरून आणावे लागले. वर्षभरात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत पोचलेला मनसे हा पहिला पक्ष असून, शिवसेना तरी वर्षभरात इतकी पोचली होती का,'' असा प्रश्‍न त्यांनी केला. पुण्यात पहिल्या वर्षी नंदू घाटे हे एकमेव नगरसेवक, नंतर पुढच्या वेळी काका वडके, त्यानंतर शशिकांत सुतार. मात्र पुण्यात मनसेचे पहिल्याच निवडणुकीत ८ नगरसेवक निवडून आले. नाशिकमध्ये १२ व २४ ठिकाणी मनसेचे उमेदवार दुसऱ्या क्रमांकावर आहेत, असे सांगून, पुण्यात मनसेचा झालेला शिरकाव महत्त्वाचा असल्याचे राज म्हणाले.

आता निवडणुकाही झाल्या आहेत व मनसेची बांधणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढच्या काळात कार्यकर्त्यांसाठी ठोस कार्यक्रम, आराखडा असेल. भविष्यात रिझल्ट दिसतील व तुमच्याच रूपाने ते दिसतील, असे राज यांनी म्हणताच कार्यकर्त्यांनी टाळ्यांच्या कडकडाडात प्रतिसाद दिला.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी जिंकणाऱ्या नेत्यांची मोट बांधून पक्ष काढला. पण मला सामान्य कार्यर्कत्यांंना मोठे करायचे आहे. असेही त्यांनी सांगितले. मनसेच्या वाटचालीबद्दल मनोहर जोशी यांनी केलेल्या टीकेलाही त्यांनी उत्तर दिले. सरांनी मागे वळून स्वत:चा राजकीय प्रवास बघावा. त्यांनी पक्षासाठी केव्हा स्वत:च्या खिशात हात घातला आहे का ? असा सवाल राजनी केला.
बाबा मला तो...

उध्दव ठाकरे यांचा नामोल्लेख न करता ते माझ्यावर दुसऱ्यांना टीका करायला लावतात. माझ्यावर थेट टीका करायची हिंमत ते करत नाहीत. स्वत: नामनिराळे रहातात. पण मी जरा फटकारले तर बाबा मला तो... अशी नक्कल त्यांनी केली.

Maharashtra Navnirman Sena



Raj Thackeray (born June 14, 1968) is a young Indian politician of Maharashtra, India. He is the founder chief of Maharashtra Navanirman sena partyRaj started his political career with right wing shiv sena party of Maharashtra. He is the nephew of Shiv Sena chief Balasaheb Thackeray. In September 2004, Raj revealed that he aspired to become the Chief Minister of Maharashtra. He however did not contest the elections.Once seen as the number 2 in the party after his uncle Bal Thackeray but sidelined by cousin Uddhav, the son of Bal Thackeray and Shiv Sena's executive President.Raj Thackeray resigned from the party in December 2005 after blaming Uddhav Thackeray and his companions of ruining the Shiv Sena. He has announced he would form a new political party.Raj has been extensively touring Maharashtra ever since he quit the Shiv Sena. Continuous efforts by his uncle, Bal Thackeray to set right the issue failed and Raj has started a new political party," Maharashtra Navnirman Sena ".